शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका : भगवान काटे, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:24 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी

ठळक मुद्देथकीत बिलापोटी शेतकºयांच्या शेती पंपांची कनेक्शन तोडली रक्कम तो भरू शकलेला नाही

कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी कोल्हापूर ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे शुक्रवारी केली.

थकीत बिलापोटी शेतकºयांच्या शेती पंपांची कनेक्शन तोडली जात आहेत; पण साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे, अद्याप शेतकºयांचा ऊस शिवारातच उभा असल्याने त्याच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे ‘महावितरण’ची थकीत रक्कम तो भरू शकलेला नाही. उसाची बिले जमा होताच थकबाकीची रक्कम भरली जाईल. त्यामुळे शेती पंपांची कनेक्शन तोडू नये, अशी मागणी काटे यांनी केली.

त्याचबरोबर विद्युत वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळले आहेत. त्याची नुकसानभरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही. संबंधित शेतकºयांना नुकसानभरपाई त्वरीत द्यावी, असेही त्यांनी सोनवणे यांना सांगितले. या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू, असा इशाराही काटे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे, आप्पाराजे खर्डेकर, सचिन शिंदे, रमेश भोजकर, सागर चिपरगे, भीमगोंडा पाटील, सचिन मोरे, भाऊसो माळी आदी उपस्थित होते.मोफत औषधोपचार कराऊसतोड मजुरांकडे रहिवासी पुरावा नसल्याने सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले असून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करावेत, अशी मागणी काटे यांनी सीपीआर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर